Friday, November 9, 2012

नाती..



काही नाती जन्मत: मिळतात,
तर काही बनतात,
आपोआप..
नकळतपणे..
काही उसवत जातात,
आपोआप.
काही विणली जातात..
जाणिवपुर्वक..
प्रत्येक नात्याला नाव असायला हवं,
अस समाजाच म्हननं असतं,
मग बिन नावाची नाती का असु नयेत?
त्यात बिघडलं काय?
बिन बापाची मुलं समाजात असतातच ना..
मग बिन नावाची नाती का असु नयेत?
का ही पळ्वाट असते समाजापासुन?
फ़सवणुक असते स्वताची?
नाव द्यायला घाबरतो आपण?
अस काय दडुन बसलय नात्यात?
रक्ताची नाती कमी पडतात
तेथुन उगम पावतात,
बहुतांश नवीन नाती..
या नात्यांचा रंग कसा असतो,
अगदी मस्त गहिरे..
बेमालुमपणे मिसळलेले असतात.
सर्व अंश..
जेव्हढे पाहिजे तेव्हढे..
पण रंगाचा बेरंग व्हायला वेळ
लागत नाही नात्यात..
कारण त्याचे आधार असतात
मानवी स्वभावाचे पाणीदार बिंदु..
हे बिंदु जेव्हढे चंचल,
तेव्हढंच नातं राहतं लवचिक..
हे बिंदुच सारे खेळ करत असतात..
काही नकळत,
तर काही मुद्दाम..
कधी स्वतालाच धोका देतात,
तर कधी फ़ितुर होतात,
कधी निष्ठावान बनतात,
जन्मभर..
काही प्रेमळ असतात,
तर तेव्ह्ढेच क्रुर.
कठोर..
प्रेमाचे नाती..
असं म्हणतात ती नाजुक असतात,
कोण जाणे?
मग बाकीची का नाजुक नसतात?
त्यांचा हॄदयाशी संबंध जास्ती पडतो म्हनुन?
नात्याच्य़ा जंजाळातुन कुणाची सुटका नाही.
कधी नात्याचा कुणि भुकेला असतो,
तर कुणाला ती जड वाटतात,
कुणाला ती नकोशी असतात..
पण जन्मापासुन-मॄत्यु पर्यंत ती साथसंगत मात्र करतात,
अगदी यथायोग्य पध्दतीने..
साला अॅरिस्टॅटल खरच हुषार मानुस,
त्याने अगोदरच ओळखलं सगळं..
किंबहुना ते सत्य होतच आधीपासुन,
त्याने ते जगाला सांगीतलं.
नात्यापासुन..
नात्यापर्यंत..
माझी धाव
नात्याएव्हढीच.

पाउस...


आभाळ भरुन आलं की
सुरवातीला मस्त वाटतं,
पण जसे मळभ अधिक गडद व
दाट होत जातात,
तस काळीज पण जड
होत जातं..
मग सुरु होते एक घुसमट.
कधी कधी ती जीवघेणी वाटती,
मळभाचे थर कधी एकदा रिक्त होतात,
अन कधी एकदा काळिज हलकं होइल
याचीच वाट पाहणं आपल्या हातात उरतं,
पण कधी हा प्रवास सुध्द्दा प्रत्ययकारी अनुभव देवुन जातो,
व मळ्भाशी आपली नाळ आणखी घट्ट करुन जातो,
मग प्रत्येक वेळेस जेव्हा मळभ दाटुन येतात,
ही नाळ तुमच अस्तित्व आणखी जिवंत करुन सोडतात..
काळया गर्द मळभामधुन धो धो पाउस कोसळावा,
अन सारया आसमंताने फ़क्त त्याचेच गाणे ऎकावे..
मग धुवुन जातात आठवणी..
फ़क्त तुर्तास..
पण खुणा मात्र तशाच उरतात.
पाउस सुध्दा हे एक निमित्तच,
आठवणि पुसुन टाकण्याकरता,
अन कधी कधी आसवं गाळण्याकरता,
कारण पाउसाच्या थेंबात तुमची आसवं विरघळुन जातात चेहरयावर,
पण शेवटी पाउस हवाच..
कोसळुन सर्व शांत झालं की,
मनालाही थंड करणारा गारठा आणतो तो सोबत,
झाडांची पानगळ करुन देतो मोफ़त,
मग सुक्या पानांबरोबर
ओल्य़ा पानांनाही नेतो बरोबर..
आठवणिंचही असच असत,
जळाल्या की सर्व एक साथ जळतात,
काही ठेवत नाहीत शिल्लक..
पानांच्या पानगळि बरोबर काटक्या-कुटक्या,
छॊट्या फ़ांद्या सर्वांचा मस्त सडा पडतो जमिनीवर,
त्यातुन मार्ग काढत निघत,
पावसाच्या खुंणाच पाणी..
पानगळीबरोबरच संपुन जाते
सर्व मरगळ..
एक फ़्रेशनेस येतो वातावरणात,
आता पुढची वेळ असते
पालवी फ़ुटण्याची..
झाडाला, काळजाला..
नात्याला...
काहि झालं तरी म्हनुन पाउस
हवाच.
....

Wednesday, November 7, 2012

"थेंब"


ओल्या तुझ्या केसातुन
एक थेंब निथळला,
गोरयापान तुझ्या पाठीवरुन 
हळुवार तो घरंगळला
पण अर्ध्या वाटेतच
अलगद तो थांबला,
तुझी पाठ सुटतच नाही
अस तो देखील म्हणाला !!

गंध !



मनाच्या माझ्या गाभारयात
पडलाय संधीप्रकाश तुझा,
दरवळे चिरंतन त्यातुन
गंध मैत्रीचा तुझा !!

पहाट



तांबडं लेवुन आली,
प्रसन्न पहाट,
घेवुन संगे
नीळाईचा धुसर ललाट..